Nutrition aptech ability: जमिनीतील, वातावरणातील बदलानुसार वनस्पतींची अन्नग्रहन करण्याची क्षमता/क्रिया

शेतीमध्ये काम करत असताना, शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामधीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे वनस्पतीची मुळाद्वारे अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया मंदावणे. याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मुळाद्वारे अन्न ग्रहण करण्याची ही क्रिया केशमुळाकडून केली जाते. मातीमध्ये सर्व पोषकतत्वांची उपलब्धता असतानाही काही प्रतिकूल परिस्थितीत पिकांना ती शोषून घेता येत नाहीत. जमीन व वातावरणात होणारे बदल यामुळे पिकांमध्ये हा बदल होतो व त्यांचे अन्न ग्रहण करण्याची क्रिया Nutrition aptech ability ही बदलत असते. त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

Nutrition aptech ability
Nutrition aptech ability

प्रश्न- कोणत्या वातावरणात वनस्पती सर्वाधिक जास्त अन्नद्रव्य उचलते?

उत्तर- सर्वसाधारणपणे असे दिसून आले आहे की, 23 डिग्री सेल्सियस ते 36 डिग्री सेल्सिअस तापमानात वनस्पती सर्वाधिक जास्त अन्नद्रव्ये शोषून घेतात. जसजसे तापमान 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी व्हायला लागते तसतसे वनस्पतीची अन्नद्रव्ये उचलण्याची क्षमता Nutrition aptech ability कमी कमी होऊ लागते. याउलट तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास पुन्हा एकदा वनस्पतींची अन्न  उचलण्याची क्षमता कमी होऊ लागते.

प्रश्न- तापमान कमी झाल्यास वनस्पतीवर कोणता परिणाम होतो?

उत्तर- सर्वसाधारणपणे 6 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यास वनस्पतीचा अन्न उचलण्याचा वेग खूपच कमी झालेला असतो. अशा वेळेस वनस्पती तनावाखाली येते, फळधारणा फुलधारणा कमी होते. फळाची फुगवण होत नाही. दिलेले खत वाया जाण्याची शक्यता असते, कमी तापमानात वेलीच्या नवीन फुटी थांबतात, शेंडे फुटत नाही, शेंडा वाढत नाही.

प्रश्न- कमी तापमानात म्हणजेच थंडीच्या दिवसात वनस्पतीला अन्नघटक कसे द्यावे?

उत्तर- कमी तापमानात म्हणजेच जास्त थंडीत शक्यतो वनस्पतींना अन्न मुळांवाटे न देता पानांमार्फत (फवारणीद्वारे) दिल्यास जास्त फायदेशीर ठरते, कारण पानांची अन्नग्रहण करण्याची क्षमता त्यावेळेस मुळांपेक्षा निश्चितच चांगली असते. अशा वेळेस दर 4-5 दिवसांनी मुख्य अन्नद्रव्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून फवारल्यास वनस्पती तणावाखाली येत नाही.

प्रश्न- जमिनीचा pH (सामू) कमी जास्त झाल्याने काय फरक पडतो?

उत्तर- जमिनीचा pH (सामू) हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे . अन्नद्रव्य संबंधित सर्व समस्यांचे निराकरण या सामुशी निगडित असते.

7.5 – 8 पेक्षा जास्त सामू वाढल्यास वनस्पतीकडून अन्न  उचलण्यामध्ये Nutrition aptech ability अडथळे निर्माण होतात. तसेच सामू कमी झाला (4-5-5)तरीही अडथळे येतात.

6.5 ते 7.5 च्या दरम्यानचा सामू सर्वात उत्कृष्ट असतो. यात सर्वाधिक जास्त अन्न उचलले जातात.

प्रश्न- कमी झालेला pH वाढवण्यासाठी काय करावे?

उत्तर- pH कमी होणे म्हणजेच जमीन ऍसिडिक होते.ज्याला आपण जमिनीची आम्लता वाढली असे म्हणतो अशा वेळेस राख टाकून पीएच वाढवता येतो किंवा क्लोराईडयुक्त खतांचा वापर जरी केला तरीही आम्लता कमी होते. बहुधा कोकण भाग सोडला तर आपल्याकडे आमलधर्मी जमिनी जवळपास नाहीत.

प्रश्न- वाढलेला पीएच कमी करण्यासाठी काय करावे?

उत्तर- जमिनीचा पीएच वाढतो म्हणजेच जमिनीमध्ये अल्कलाईड वाढलेले असतात, ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी झालेला असतो, सर्वसाधारणपणे अशा जमिनीमध्ये पीएच वाढतो.अशावेळी सेंद्रिय खतांचा, निविष्ठांचा वापर वाढवावा जसे की शेणखत, कंपोस्ट खत ,गांडूळ खत, हिरवळीचे खत यांचा वापर वाढवावा. सूक्ष्मजीवाणूची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा. सूक्ष्मजीव वाढीला लागण्यासाठी पोषक वातावरण जमिनीमध्ये तयार करावे.

प्रश्न- जमिनींचा Ph वाढल्यास कोणकोणते अन्नद्रव्य उचलण्याचे प्रमाण कमी होते?

उत्तर- जमिनीचा पीएच वाढल्यास  मुख्यतः  स्फुरद,  नत्र,  कॉपर,  मँगेनीज, सिलिकॉन यांचे प्रमाण  कमी होते.

प्रश्न- चुनखडी जमिनीच्या कोणत्या कोणत्या समस्या असतात?

उत्तर- चुनखडी जमिनीत अन्नद्रव्य फिक्स होण्याचे प्रमाण वाढते. वनस्पतींना अन्नद्रव्याचा पुरवठा होण्यासाठी अडथळा तयार होतो.अशा जमिनीमध्ये पाने पिवळी पडणे, शेंडा थांबणे,  फुल तसेच फळधारणा कमी होणे अशा समस्या तयार होतात.

प्रश्न- चुनखडी जमिनीत काय काय उपाययोजना कराव्यात?

उत्तर- चुनखडी जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवावे, यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीच्या खतांचा वापर करावा. मल्चिंगचा वापर करावा. जमिनीची सतत मशागत करावी आणि अन्नद्रव्य देताना क्लोराईड युक्त खतांचा वापर कमी करावा. (जीवामृत) स्लरीचा वापर वाढवावा.

प्रश्न- चुनखडी जमिनीत कोणते कोणते अन्नद्रव्य जास्त द्यावे, कोणते कमी द्यावे?

उत्तर- चुनखडी जमिनीत लोह, स्फुरद, नत्र, पालाश, जस्त, तांबे जास्त द्यावे लागतात.

चुनखडी जमिनीत कॅल्शियम कमी द्यावा लागतो. चुनखडी जमिनीत स्फुरद उचलण्यासाठी मॅगेनीज सल्फेट चा वापर वाढवावा लागतो.

फेरस सल्फेट दिल्यास त्याचा फायदा चुनखडी जमिनीत जास्त होतो. सल्फरचा वापर वाढवणे हे अधिक फायद्याचे ठरते.

प्रश्न- सल्फर (गंधक) चे काय फायदे आहेत ?

उत्तर- सल्फर हा दुय्यम अन्नघटकात मोडला जातो. याचे अनेक फायदे आहेत जसे की तो अन्नद्रव्य असून, बुरशीनाशक पण आहे.

जमिनीचा सामू नियंत्रित करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा आहे. इतर अन्नद्रव्यांना उचलण्यासाठी Nutrition aptech ability सल्फरची मदत होते .

सल्फर हा उष्ण असल्याकारणाने थंडीच्या दिवसात जमिनीवर वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी आणि अन्नद्रव्याचे वनस्पतीला वहन करण्यासाठी फायद्याचा ठरतो.

हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम, आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना…

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version